Monday, July 31, 2017

आंदोलनाचे हिशेब

शनि शिंगणापूर खेळखंडोबावरून सहज आठवल म्हणून . . . ================================================= मी डिप्लोमाच्या दुसर्या वर्षात शिकत होतो. वर्गात १२ वी नंतर डिप्लोमाला प्रवेश घेतलेले आम्ही १२ ते १५ जन होतो. त्यात नेहमीच प्रत्येक गोष्टीत लीड करणारा माझा एक मित्र होता. दुसर्या वर्षाला असताना कॉलेजने कशाचीतरी फी अचानक वाढवली - नेमक आठवत नाही. झालं, आमच्या नेत्याने तडक कॉमन ऑफ ची हाक दिली. एखाद दुसरा अपवाद वगळता वर्ग ओस पडला. प्राचार्यांना हि बातमी समजताच त्यांनी आमच्या नेत्यास आपल्या कार्यालयात पाचारण केलं. कॉमन ऑफचं कारण विचारताच त्याने फी वाढीचा मुद्दा मांडला. आमचे प्राचार्य करारी असले तरी अतिशय समंजस होते. ते म्हटले, "फी वाढली वगैरे ठीक आहे, त्यासाठी आंदोलन पण ठीक आहे. पण त्यासाठी काहीतरी पद्धत असते याची तुम्हाला कल्पना आहे का?" त्याने नकारार्थी मान डोलावली. त्याला समजावत सर म्हणाले, " अरे यासाठी पहिल्यांदा सबंधित व्यक्ती किंवा खात्याबरोबर पत्रव्यवहार करावा, भेट घेऊन मुद्दे मांडावे आणि दाद न मिळाल्यास मग आंदोलन करावे." आपली चूक मित्राच्या लक्षात आली. तसं त्याने कबुल केल आणि निरोप घेतला. तो प्रश्न अर्थातच सुटला नाही कारण ती शासकीय संस्था असल्याने त्यात कॉलेजचा काहीही संबंध नव्हता. असो. =============================================== आता मुळ मुद्दा … शनी मंदिरातील स्त्री प्रवेशाचा जो मुद्दा आहे त्यासाठी गाजावाजा न करता न्यायालयीन लढाईचा मार्ग उपलब्ध नाही, का उठसुठ बाबासाहेबांचा वापर करणार्या पुरोगाम्यांचा कायद्यावर आणि न्यायपालीकेवर विश्वास नाही? पूर्वी गावाकडे आणि काही ठिकाणी आजही स्त्रिया हनुमानाच्या मंदिरात जात नाहीत. शहरात मात्र बर्याच ठिकाणी स्त्रिया आत जाऊन पूजा करतात. खरोखर इथे जर मुद्दा स्त्रियांना कमी लेखण्याचा असता तर याठिकाणी सुद्धा विरोध केला गेला असता. अशा परंपरा त्यावेळी का सुरु केल्या गेल्या हे आपल्याला नेमक माहित नाही. पण यानिमित्ताने चर्चा घडवून किंवा संविधानिक मार्गाने सुद्धा समस्या सोडवता आली असती. पण अस केल तर पैसा आणि रातोरात प्रसिद्धी मिळत नाही. आपल्या विचाराशी भिन्न असणाऱ्या सरकारविरोधातील हिशेबही चुकते होत नाहीत हे मूळ कारण आहे. उद्या असा प्रवेश दिला गेला (आणि तो द्यावा) तरी खरोखरच जादूची कांडी फिरून सर्वत्र स्त्री-पुरुष समानता येईल किंवा स्त्रियांचा सन्मान होईल अस मानणारे मूर्खांच्या नंदनवनात बागडतायत एवढंच म्हणता येईल. तूर्तास पुरे. @शैलेंद्र दिंडे 27/01/2016

No comments:

Post a Comment