Monday, July 31, 2017

मदारी आणि महाड

महाडची दुर्घटना होण्याच्या दोनच दिवस आधी इरफान खानचा "मदारी" पाहिला होता. आजच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळाला आणि जनता म्हणून सामान्य माणसालाही त्याच्या क्लायमॅक्स मध्ये उघडं पाडलेलं आहे. घटना कोणतीही असो; आमच्या प्रतिक्रियासुद्धा व्यक्ती, पक्ष, जात, धर्म पाहूनच बाहेर पडतात. एकमेकाविषयीचे हिशेब चुकते करण्यासाठी अशा घटना म्हणजे सुवर्णसंधीच जणू. पूर्वी विरोधात असणारे धडाकेबाज (!) नेते आता सत्तेत आहेत आणि जणू सत्तेसाठीच जन्म झाल्याच्या अविर्भावात असणारे विरोधात बसलेत. कालच्या त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा अगदी बोलक्या आणि अपेक्षित होत्या. धरणवीर दादासाहेब विधानसभेत म्हणाले कि संबंधित ब्रिटिश कंपनीने ५ वर्षाआधी सूचना देऊनही पूल वापरातून बाद का नाही केला? आता पाच वर्षांपूर्वी राज्य कोणाचं होत हे बहुतेक तावातावत बोलताना ते विसरले. कोणी जगताप नावाचे माजी आमदारसुद्धा घटना स्थळी हीच प्रतिक्रिया मीडियाला देत होते. मा. मु. मं. आणि संबंधित खात्याचे मंत्री म्हणतायत कि आम्ही सगळ्या ब्रिटिशकालीन पुलांच स्ट्रक्चरल ऑडिट करू. परंतु, गेल्या मे मध्ये केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये हाच पूल वापरास योग्य घोषित केला गेलाय. त्याचं काय? आणि हा एकूणच प्रकार "वरातीमागून घोडं" असाच नाही का? असो. दुर्दैव हे कि एवढ्या मोठ्या दुर्घटनेतून सुद्धा आम्ही काहीच शिकणार नाही तेच अंतिम सत्य आहे. पंधरा - वीस दिवसांनंतर मृतांचे सर्व अंतिम संस्कार (प्रेत सापडलच तर) पूर्ण झालेले असतील. मीडियाला अधिक टीआरपीवाली एखादी घटना हाती लागलेली असेल आणि विविध चॅनेल चे अँकर ती आपल्यापर्यंत "सब से तेज" पोहोचवण्यासाठी अगदी ऑरगॅसम आल्यासारखे किंचाळत असतील. तुम्ही आम्ही टीव्ही समोर तंगड्या पसरून चहा-पोहे कांदाभजीचा आस्वाद घेता घेता त्या बातमीचा आनंद घेत असू. नेतेमंडळी त्या बातमीत गाय - बैल, पुतळा वगैरे शोधतील आणि आपल्याला धंद्याला लावण्यासाठी आपली बुद्धिमता पणाला लावतील. एकदा का आपण धंद्याला लागलो कि त्याच गदारोळात एखादा आदरणीय ब्लॅक लिस्टेड कंत्राटदार पन्नासेक पुलांची कंत्राट मिळवेल. ते पूर्णत्वाला जाण्याअगोदर टोलचं दुकान थाटेल. खळ्ळखट्याकवाल्यांचा रोजगार पुन्हा सुरु होईल. सत्ताधारी पक्षाचे समर्थक विकासाच्या गोंडस नावाखाली त्याच समर्थन करतील आणि विरोधक प्रथेप्रमाणे गळे काढतील. दरम्यान पुन्हा एकदा एखादं "महाड" घडेल आणि हेच चक्र पुन्हा पुढे सुरु राहील. *********************************************** - देखो, क्या चाहिये तुमको? "सिर्फ सच, नो मोर गेम्स, सच।" - सच? सच डरावना है, दिल दहल जायेगा। सरकार भ्रष्ट है यह सच नही हैं। भ्रष्टाचार के लिये हि सरकार है, यह सच हैं। - ये जो अखबारों में, टीव्ही पे जो खबरे सुनने में आती है; सत्तर हजार करोड - एक लाख करोड - दो लाख करोड, ये अजिबसी इम्पोस्सिब्ल रक्कम . . . . ये असल में . . "ये एक्सिस्ट करती है, हम में से कईयों के पास है, हम बाट के लिए है। -चाहे कुर्सी पे बैठे हो या नही बैठे हो, दुसरा बैठा हो, दुकानदारी चलती रहती है। "गव्हमेंट कॉन्ट्रॅक्टर है तो ऑपोझिशन ठेकेदार। करोडो अरबो का ठेका है, अकेले से नही होगा। - हां तो १२० करोड के बारे में सोचने का टाइम कब होगा? "१२० करोड? मॅथ्स गडबड है तुम्हारा। बटे हुए हो तुम लोग, धर्म - जाती - प्रांत। हम फिगर अनालाईज करते है। १२० करोड नही, टुकडे, छोटे छोटे टुकडो में बटे हुए हो। लकडी का बंडल नही, अलग अलग लकडिया, जो टूट जाती है आसनी से। तभी तो हम तुम्हे . . . जुतीयो के नीचे रौदते है हम तुम्हे। - तो ये कोई स्कॅम स्कॅम नही है। ये असल में आप लोग का प्रायमरी धंदा है। "राईट" - लेकिन हम लोगों को खुश करने के लिये भी तो आप बहोत कुछ करते हो। "हां, युनिफॉर्म तक पहनते है। देखो, जीन्स पहने हुए हम में से किसी को देखा है कभी आजतक? और पार्लियामेंट जाते है, असेम्ब्ली जाते है, वहा जा के बहस करते है। धूप में, गर्मी में भाषण देते है और वोट भी तो मांगते है। जो अच्छे हैं, होनेस्ट है, उन्हे साईड कर देते है। वो तो बस्स डेकोरेटिव्ह पीस है हमारे लिये। पॉवर उन्ही के हाथो में है जो कमा के दे सके। और वैसे गलती तो तुम्हारी है , हम सपने दिखाते है, लेकिन तुम देखते हो। सच्चाई दिखती हि नही है। सडक कहा से बननी है पहले हमे पता चलता है। तो आसपास कि बेनामी जमीने हम हि खरीदते है, हम हि सरकार को बेचते है और हम हि प्रॉफिट कमाते है। और डिटेल में जाऊ क्या? मैने तो अपना पोलिटिकल करिअर अपने बेटे के लिये कुर्बान कर दिया। लेकिन धंदा बंद नही होगा। प्रायमरी बिझिनेस, कहा ना तुमने प्रायमरी बिझिनेस। और ये डण्डा, पुलिस, कॉन्स्टिट्यूशन; वो बस तुम लोगोंको डराने के लिये। बस्स ठीक है? खुश? जीत गये तुम? ह्याप्पी एंडिंग? *********************************************** मागे एकदा मी लिहिलं होतं ते लिहिण्याची दुर्दैवी वेळ पुन्हा पुन्हा येतेय . . . "राष्ट्र म्हणून कधीच आपण एक नव्हतो, नाहीत आणि नसणार." कधी कधी मला पाकिस्तान्यांचे आभार मानावेसे वाटतात (तुमच्या जबाबदारीवर तुम्ही याचा वेगळा अर्थ काढण्यास स्वतंत्र आहात) ते यासाठी कि त्यानिमित्ताने का होईना आमचा राष्ट्रवाद जागा होतो. तुम्हा आम्हा सर्वाना सिस्टिम सुधारण्याची गरज वाटते. पण त्याची सुरुवात स्वतःपासून करता येत नाहीये हीच खरी शोकांतिका आहे. @शैलेंद्र दिंडे ०४/०८/२०१६

No comments:

Post a Comment