Monday, July 31, 2017
रचनात्मक टीका
जवळपास ९ वर्षे नेटवर्क मार्केटिंग क्षेत्रात होतो. तिथं मी काय हरवलं यापेक्षा तिथून मी काय मिळवलं हे मला जास्त महत्वाचं वाटतं.
९ वर्षात हजारो माणसांशी प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष संबंध आला. या क्षेत्रात जसजसे तुम्ही वरच्या पायरीवर जाता तसतसे तुम्ही काय आणि कसे विकु शकता यापेक्षा तुम्ही माणसांशी कसे वागता, त्यांना कशाप्रकारे वागवता याला खुप महत्त्व दिले जाते. हे काम सोप्प व्हावं म्हणुन विविध प्रशिक्षण कार्यक्रमातुन जावं लागतं.
यातलाच एक धडा म्हणजे एखाद्याची चुक त्याला लक्षात आणुन द्यायची असेल तर कमीत कमी नुकसान करून हे काम पार पाडण्याची कला.
माणुस छोटा असो की मोठा - प्रत्येकाला आत्मसन्मान असतो. चुक लक्षात आणुन देत असताना त्या आत्मसन्मानाला ठेच लागु न देणे हे आपलं प्रथम कर्तव्य असतं.
अशी चुक लक्षात आणुन देण्यापुर्वी त्याने केलेल्या चांगल्या कामांची प्रथम खरीखुरी आणि मनापासून स्तुती करावी. एक नेता म्हणुन त्या व्यक्तिमधे असलेल्या इतर चांगल्या गुणांची प्रामाणिक दखल घ्यावी ज्यामुळे आपल्याला त्या व्यक्तिबद्दल खरच आदर आहे हे कळेल. त्यानंतर त्याच्याकडुन अनावधानाने घडलेल्या चुकिबद्दल कल्पना द्यावी. त्याला चुक सुधारण्याची संधी देण्याबरोबरच त्याच्यापाठी आपण ठामपणे उभे आहोत हा विश्वास निर्माण करणे जास्त महत्वाचे.
जर एखाद्या व्यक्तीमधे असणार्या चांगल्या गुणांची आपण स्तुती करु शकत नसु तर त्याच्या चुकीच्या गोष्टीं विषयी बोलण्याचासुद्धा आपल्याला हक्क रहात नाही.
******************************************
काल मा. जावेद अख्तर साहेबांचं राज्यसभेतलं भाषण ऐकल्यावर मला हे मुद्दाम शेअर करावं वाटलं.
आजकाल आपला राजकीय पट constructive criticism पासून कोसो दूर चाललेला असताना अख्तर साहेबांच भाषण म्हणजे एक आशेचा किरण मानायला हरकत नाही.
@शैलेंद्र दिंडे
१६/०३/२०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment