Monday, July 31, 2017
व्यक्ती एक . . . चेहरे अनेक
उनाड बालपण
बादरे साहेब
आंदोलनाचे हिशेब
एक धडा असाही ...
"ती"
मनुस्मृती नावाचं थोतांड
रचनात्मक टीका
फकीर नाईक
हाल्या
अलिबाग से आयेला है क्या?
मदारी आणि महाड
सोळावं वरीस नोकरीचं
माझं इंग्रजी आणि पहिली मुलाखत
माझं इंग्रजी आणि पहिली मुलाखत. ************************************* ६ ऑगस्ट १९९८, वेळ दुपारी ३ ची. लेखी परीक्षा पास झालेले आम्ही १२-१३ जण सांताक्रूझच्या जुन्या ऑफिसमध्ये पहिल्या माळ्यावर मुख्य-अभियंत्यांच्या कॅबीन बाहेर उभे होतो. त्यातला एक सोडून बहुतेक सर्व फ्रेशर. काहीजण फाडफाड हिंदी - इंग्रजी बोलणारे. आता या सर्व परीस्थित आपल्यासारख्या इंग्रजी मिडीयम चा डिप्लोमा सुद्धा मराठीत शिकलेल्या उमेदवाराचा टिकाव कसा लागणार ह्या काळजीने हृदय आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत होतं. सुरुवातीलाच दोन उमेदवारांची विकेट पडल्याचे कळल्याने स्वेद-ग्रंथींनी शरीराला थंड ठेवण्याच आपलं काम चोख बजावायला सुरुवात केली होती. हे कमी कि काय म्हणून एका महाशयांनी जाता जाता मुलाखतीच्या pannel वर असलेले करकेरिया साहेब आणि त्यांच इंग्रजी याविषयी सांगून माझा कडेलोटच केला. एवढ्यात माझ्या व अजून एका voltas मध्ये काम करणाऱ्या उमेदवाराच्या नावाचा पुकारा झाला. दोघेही आत गेलो. कौटुंबिक पार्श्वभूमी आणि इतर माहिती विचारून झाल्यावर तांत्रिक प्रश्न सुरु झाले. बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरं मी जमेल तेवढ्या अचूक इंग्रजीत देण्याचा प्रयत्न करत होतो. एव्हाना माझी भाषेची अडचण pannelists च्या लक्षात आली होती. आणि ती वेळ आली. एका बेसावध क्षणी करकेरिया साहेबांनी एक प्रश्न माझ्या दिशेने फेकला, "Can you expand SF6?" अगोदरच माझ्या इंग्रजीची बोंब, त्यात EXPAND म्हणजे "प्रसरण पावणे" हा एकाच अर्थ मला माहित होता. त्यामुळे मनातल्या मनात " Yes, we can expand SF6 by releasing pressure on it." असं उत्तर तयार होत होतं. पण नेहमीच्या सवयीने मी थोडा पॉझ घेतला. तेवढ्यात बाजूला बसलेल्या अजून एका साहेबांनी SF6 चा फुल फॉर्म काय? असं विचारलं. अचानक दहा हत्तींच बळ आल्यासारखं मी खणखणीत उत्तर दिलं, "सल्फर हेक्झाफ्लोरायीड." OK You can go now. बाहेर आलो. तेवढ्यात शिपायाने मला बोलावून घेतलं. बहुतेक आपलीही विकेट पडली कि काय या विचाराने पावलं जड झाली होती. त्याने सरळ येउन माझे हात हातात घेतले व अभिनंदन केलं. "तुझं सिलेक्शन झालंय" ह्या त्याच्या वाक्यातून त्यावेळी मला मिळालेला आनंद मी शब्दात कसा व्यक्त करू?
मराठ्यांनो ... उघडा डोळे, पहा नीट!
बदलाची सुरुवात स्वतःपासून
अट्रोसिटी आणि मराठा मोर्चा
मराठा मूक मोर्च्यांच्या निमित्ताने ...
पवन रघुनाथ आहेर
कल्पकता ... शोधाची जननी
नोटबंदी आणि दंग्याची खाज
आमचा आंदु
नोटबंदी
यूपीचं पानिपत
डॉक्टर्स आणि ट्रस्ट डिफिशिट
आत्मविश्वास
दुरून डोंगर साजरे
अभ्यासिकेतले किडे
देश प्रथम ...
तिसरी बाजू
निवड स्वातंत्र्य
इतिहास, पुराण आणि मी
***** इतिहास, पुराण आणि मी ***** मुळात पाठांतर हा माझा पिंड नव्हे. बहुदा इनबिल्ट अभियांत्रिकी मेंदू, त्यामुळे एखादी कन्सेप्ट खोलात जाऊन समजावून घ्यायची म्हणजे विसरण्याचा प्रश्नच नाही. हा सिम्पल फंडा. *** हे अवांतर यासाठी की थोडी स्वतःच स्वतःची पाठ खाजवून घेतल्याशिवाय पोस्टला वजन येत नाही म्हणून *** तर मूळ मुद्दा असा की आम्ही शाळेत असताना आमचे इतिहासाचे शिक्षक (नीट नाव सुदधा आठवत नाही) हे काही इतिहासप्रेमी म्हणून विषय शिकवत नव्हते, तर अंगावर टाकलेली जबाबदारी (पक्षी पाटी असे वाचावे) वाहण्याचं काम करत होते. वर्गात घुसल्या घुसल्या स्वतः पुस्तक उघडणे (मग आम्हीही उघडणे हे योगाने आलंच) आणि सत्यनारायणाची पूजा सांगणाऱ्या भटजींना लाज येईल एवढ्या वेगाने वाचून धडा 'संपवणे' यालाच ते आपलं इतिकर्तव्य माणणाऱ्यातले होते. त्यातून इतिहासातल्या सणसणावळ्या म्हणजे माझ्या कट्टर शत्रू. कितीही घोकंपट्टी केली तरी मेल्या मला काही पावायच्या नाहीत. मग जे जमत नाही, आवडत नाही ते ऑपशनला टाकणं हे ही ओघाने आलंच. पण म्हणून मला इतिहास आवडत नव्हता असं नाही. इतिहासातील प्रत्येक पात्र वाचताना जणू ते अंगात शिरल्याचा भास व्हायचा. सगळंच भव्य दिव्य. बिळाशीच्या मराठी शाळेत चौथी - पाचवीत असताना आम्हाला शाळेत पडद्यावर ब्लॅक अँड व्हाईट मध्ये बालशिवाजी चित्रपट दाखवण्यात आला होता. पुढे पाटील गल्लीतली आमची झुंड कित्येक दिवस चिनीदांडू आणि गोट्या बाजूला ठेऊन गारवेलच्या छपाट्या तलवारी सारख्या वापरून राजांचा गनिमी कावा आणि लढाया खेळण्यात गुंग झाली होती. 'थोरांचा इतिहास' अभ्यासताना त्या थोरांची जात प्रथम पाहण्याचा नतद्रस्टपणा तेव्हा समाजात भिनलेला नव्हता. त्यामुळे शाहू महाराज हे कल्याणकारी राजा म्हणूनच लक्षात राहिले. जोतिबा फुले आणि सावित्रीबाई हे शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते म्हणूनच लक्षात राहिले. लोकमान्य म्हटलं की त्यांचा बाणेदारपणाच आठवतो. सावरकर म्हटलं की जाज्वल्य देशप्रेम आणि बाबासाहेब म्हटलं की त्यांची विद्वत्ताच आकर्षित करते. आपला समृद्ध इतिहास आणि पुराण ही आता काही लोकांसाठी रोजीरोटीचं साधनमात्र राहिलेल्या आहेत. ती रोजीरोटी टिकून राहावी आणि पर्यायाने पुढच्या पिढ्यांची सोय लावता यावी यासाठी रोज नवा इतिहास जन्माला घातला जातोय आणि जाईल. आताची कोवळी पिढी मात्र ह्याचं खरं की त्याचं खरं या दुविधेत एक दिवस इतिहास विषय कायमचा ऑपशनला टाकील आणि तो दिवस सगळ्यात दुर्दैवी म्हणून गणला जाईल. आदरणीय राजीव साने सरांनी आज एक अतिशय छान पोस्ट लिहिलीय, "भूतकाळ बदलत नाही पण त्याचा अर्थ बदलतो म्हणून इतिहासकारांना वाटते आपणच तो घडवतो" नव्या पिढीने यातला गर्भित अर्थ समजून घेणं खूप गरजेचं आहे. अन्यथा जुने इतिहासकार आणि नवे उदयोन्मुख इतिहासकार यांच्या वादात एकदिवस आपण एकमेकांपासून एवढे दूर जाऊ की आपल्या प्रत्येक घराभोवती सुरक्षेसाठी तटबंदी उभारावी लागेल. शैलेंद्र दिंडे २२/०६/२०१७
भाभी आणि शकील
जीएसटीच्या आडून
मुंबई, मालिशका आणि खड्डे
दरवर्षी (वर्षानुवर्षे) मुंबईत तुफान पाऊस पडतो. ठराविक सखल भागात पाणी भरतं. नागरिकांचे संसार रस्त्यावर येतात. मुंबईत येऊन मला १९ वर्षे झालीत. पूर्वी मी राहत असलेला डिलाईल रोड, लोअर परेल असेल किंवा काम करत असलेला पश्चिम उपनगरांचा भाग असेल, काही ठिकाणी नित्यनेमाने पाणी भरत असतं. रस्ते खराब होत असतात. वाहतुकीची कोंडी होत असते. दरवेळी महापालिका तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी करत असते आणि नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळत असतो. आधी संपूर्ण मुंबईतले रस्ते हे महापालिकेच्या ताब्यात होते. ८-१० वर्षापूर्वी यातला काही भाग एमएमआरडीएकडे सोपवण्यात आला होता. दोन्ही संस्थांनी मिळून यथेच्छ गोंधळ घालून ठेवलेला आहे. याचे परिणाम सामान्य नागरिकास भोगावे लागतात. महापालिका किंवा एमएमआरडीए ने अजिबात काम केलेलं नाही असंही नाही. पण दोघांना मिळणारा निधी पाहिला तर एव्हाना मुंबईचं शांघाय व्हायला हरकत नव्हती, हे शेंबड पोर देखील सांगेल. मग नेमका विकास का नाही झाला? कालपर्यंत चाळीत राहणारा (कोणत्याही पक्षाचा) कार्यकर्ता नगरसेवक झाला की पाच वर्षात त्याच्या बुडाखाली फॉर्च्युनर येते नी तो चाळीतून किमान २-३-४ बीएचके च्या घरात शिफ्ट होतो. रस्ते विभागात चिकटलेला नुकतंच मिसरुट फुटलेला अभियंता दोन किमी रस्ता बांधला की चार चाकीतून उडायला लागतो. वरच्या अधिकाऱ्यांच्या बाबतीत तर न बोललेलं बरं. मालिशकाने नेमकं "त्या" गाण्यातून वर्मावर बोट ठेवलं तर साऱ्यांची पंचायत झाली. परवा एका नगरसेविकेने सांगितलं की हे गाणं म्हणजे तमाम मुंबई आणि मराठी माणसाचा अपमान आहे. कसं काय बुवा? खड्ड्यात आयुष्य गेलेल्या मुंबईकराला कधी टेबलाखालच्या पाकिटाचा वास तरी दिलात का? अंगावर आलं की मराठी माणसाची ढाल पुढे करणार का? त्यापेक्षा "येत्या मोसमात माझ्या प्रभागात कुठेही पाणी भरणार नाही अशी व्यवस्था निर्माण करेन" अशी शपथ घेतली असती तर मतदारांचं भलं नसतं का झालं? हद्द म्हणजे त्या गाण्यासाठी म्हणे मालिशकावर ५०० कोटींचा अब्रूनुकसानभरपाईचा दावा ठोकणार. कोणाची अब्रू? आणि कुठे असते ती? भरा खटला, जिंका आणि ते पैसे तरी कारणी लावा. अजून काय बोलणार! -- हतबल माजी नागरिक - बृमुंमपा
व्यक्तिस्वातंत्र्याचा पान्हा
मोहन ...
"मोहन . . . . " नेहमीप्रमाणे खाली मान घालून ऑफिस च्या गेटमध्ये घुसत असतानाच त्याच्या कानावर हाक आली. आवाजही ओळखीचाच होता, म्हणून त्याने मागे वळून पाहिलं. हो, ती आशु होती. दहा बारा वर्षांपूर्वी तो ज्या ठिकाणी भाडेकरू म्हणून राहात होता, त्या घर मालकाची एकुलती एक लेक. दिसायला तशी सावळीच, पण नाकी डोळी नीटस, उंचीपुरी आणि कमालीच्या आत्मविश्वासाने भरलेली. खरतर आत्मविश्वास हेच तीच सौंदर्य होत. जन्मताच आईची साथ सुटलेली. त्यामुळे सावत्र आईच्या हाताखाली राबता राबता उर्वरित वेळात अभ्यास करून शिकावं, मोठ्ठ व्हावं यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करायची. म्हणतात ना 'संकट त्याच्याच वाट्याला येतात त्याच्यात ती झेलायची क्षमता असते', काहीस असंच तिचं आयुष्य होतं. बी कॉम च्या शेवटच्या वर्षाला असतानाच किरकोळ तापाचं निमित्त झालं आणि वडील गेले. सावत्र आई आणि दोन सावत्र भावंडांची जबाबदारी तिच्यावर पडली . . . खरतर तसं नातेवाईकांनीच तिच्या गळी उतरवलं. तिनेही न डगमगता ती जबाबदारी स्वीकारली, मात्र एका अटीवर - शिक्षण अर्धवट न सोडण्याच्या. एका छोट्याश्या घटनेने तीच आयुष्य आमूलाग्र बदललं. वडील गेल्यानंतर सावत्र आईने अंथरून धरलं. दोन भावंडं अनुक्रमे १० आणि १३ वर्षांची, पण जबाबदारी आणि परिस्थितीची कोणतीही जाणीव नसलेली. त्यामुळे रोज सकाळी चारच्या ठोक्याला तिचा दिवस सुरू व्हायचा. आंघोळपाणी उरकायचं, तिघांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करायची, स्वतःसाठी डबा घायचा आणि सहा वाजता कॉलेजला जाण्यासाठी घर सोडायचं. दुपारी दोन ला घरी यायचं. भांडी - कुंडी, धुणी उरकायची, मग सहा पर्यंत स्वतःचा अभ्यास आणि पुन्हा स्वयंपाक करता करता १० - १५ पोरांची शिकवणी घ्यायची. सगळं उरकता उरकता झोपायला रोजचे ११ वाजायचे. या सगळ्या धबडग्यात तीच स्वतःकडे अक्षम्य दुर्लक्ष व्हायला लागलं. परिणाम चेहऱ्यावर दिसायला लागले. एका बाजूला वय वाढत चालल्याची जाणीव आणि दुसरीकडे जबाबदारीचं ओझं; पुरती पिचून गेली होती बिचारी. मोहन नुकताच एका बड्या उद्योगसमूहात बड्या हुद्यावर रुजू झाला होता. आशूच्या धडपडीचं त्याला मोठ्ठ कौतुक वाटायचं. पण दोघांच्याही व्यस्त वेळापत्रकामुळे कधी फारसं बोलणं - भेटणं व्हायचं नाही. चुकून एखाद्या रविवारी संध्याकाळी थोडी संधी मिळाली की ती न चुकता त्याच्या घरात जायची. इकडच्या तिकडच्या गप्पा व्हायच्या. हळूहळू मैत्री घट्ट होत गेली. मोहन वेळप्रसंगी तिला मदतीचा हात द्यायचा. ती ही न चुकता वेळेत परत फेड करायची. आशु मोहनच्या दिलदारपणामुळे त्याच्याकडे आकृष्ठ होत होती. तो मात्र तिच्याकडे फक्त एक रोल मॉडेल आणि चांगली मैत्रीण म्हणून पाहायचा. दरम्यान तिने बी कॉम पूर्ण केलं आणि एका सी. ए. च्या कार्यालयात ती नोकरी करू लागली. काही दिवसानंतर तिच्या त्याच्याविषयीच्या भावना त्याला लक्षात यायला लागल्या. तसा तो सावध झाला. तो स्वतः कठीण परिस्थितीतून वर आला होता. "आंतरजातीय" वगैरे लफड्यात पडून कुटुंबाची विनाकारण वाताहत होईल ही भीती कायम त्याच्या मनात होती. थोड्याच दिवसात मोहनने स्वतःचं घर खरेदी केलं आणि त्यानं आशुचा निरोप घेतला. त्यापासून १२ वर्षात एखाद दुसरा प्रसंग वगळता त्याला कधीही आशूची आठवण झाली नाही, तसं काही कारणही नव्हतं आठवण होण्याचं. आज तिला असं अचानक पाहून क्षणार्धात सर्व पट त्याच्या डोळ्यासमोर आला. एकमेकांना एवढ्या वर्षांनी भेटून दोघांनाही अतिशय आनंद झाला. थोडीफार इकडची तिकडची चौकशी झाली. मात्र वेळेअभावी दोघांना फार वेळ बोलता आलं नाही. मग एकमेकांच्या नंबरची देवाणघेवाण झाली आणि दोघीनींही निरोप घेतला. दिवसभराचं काम संपवून मोहन घरी पोहोचला होता. रात्री अकराच्या आसपास त्याचा मोबाईल खणखणला. अर्थातच, आशुचा फोन होता. थोड्याफार गप्पा झाल्या आणि मग तिने थेट दुसऱ्या दिवशी तिच्या नवीन घरी भेटण्याचं त्याला आमंत्रण दिलं. आमंत्रण कसलं . . . आगह केला. उरात थोडीफार धाकधूक होती, तरीही मोहन तयार झाला. सकाळी निघतानाच त्याने बायकोला रात्री यायला उशीर होईल असं सांगून ठेवलं. ठरल्याप्रमाणे तो संध्याकाळी सात वाजता आशूच्या घरी पोहोचला. ती एकटीच होती. चहा नाश्ता होता होता गप्पा रंगल्या. दरम्यान ती अजूनही अविवाहित असल्याचं त्याला समजलं. . . . अर्थातच त्याच्या प्रतीक्षेत. तिची आई देवाघरी पोहोचली होती आणि दोन्ही भाऊ कुठल्याशा गुन्ह्यात जेलमध्ये. तिच्या वाट्याला उरलं होतं फक्त एकाकी जीवन. मोहनच्या पुन्हा भेटण्याने आशूच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. वाढत्या वयाबरोबरच तिला आधाराची गरज वाटू लागली होती. एकट्या बाईच्या नशिबी जेवढे भोग येतात ते भोगल्यामुळे तिचा कोणाही पुरुषावर विश्वास उरला नव्हता . . . अपवाद होता मोहनचा. पण मोहन स्वतः विवाहित आणि एका लेकराचं बाप होता. त्यामुळे स्वतःच्या सुखासाठी त्याच्या संसारात विष कालवण्याएवढी ती निष्ठुर किंवा मतलबी नव्हती. पण तिच्या डोक्यात एक वेगळाच विचार मोहन भेटल्यापासून सुरू झाला होता. तिला आता थांबायचं नव्हतं. "मोहन, मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचंय." थोडं गंभीर होत आशु म्हणाली. "बोल ना." थोडं सावध होत तो बोलला. "गैरसमज करून घेऊ नकोस. पण मला जे वाटतंय ते तुझ्याशिवाय मी कोणाला सांगू?" "बोल ग, अगदी बिनधास्त बोल." क्षणाचाही विलंब न करता ती उद्गारली, "मला जगण्यासाठी आधार देशील?" तीच वाक्य ऐकून तो हादरलाच होता. पण तरीही स्वतःला सावरत तो म्हणाला, "म्हणजे?" "एक मूल टाकशील माझ्या पदरात?" कानात कोणीतरी गरम शिसं ओतल्यासारखी त्याची अवस्था झाली होती. क्षणार्धात त्याच्या डोळ्यासमोरून जीव ओवाळून टाकणारी पत्नी आणि निष्पाप मुलाचा चेहरा तरळून गेला. काहीही बोलायला त्याला शब्द सुचत नव्हते. त्याला तिचा राग आला नव्हता. पण तिच्या असहाय्य्यतेची दया मात्र येत होती. हतबल होऊन तो सोफ्यावरून उठला आणि दरवाजा उघडून तडक घरी गेला. आशु मात्र शून्यात नजर लावून तिथेच बराच वेळ बसून राहिली. आज मोहनचं कशातही लक्ष लागत नव्हतं. बाहेर जेवून आल्याचं निमित्त सांगून तो सरळ झोपायला गेला. मात्र उशिरापर्यंत त्याचा डोळ्याला डोळा लागला नाही. विचार करून करून मेंदू थकला आणि मग पहाटे कधीतरी तो झोपी गेला. सकाळी आठला त्याच्या बायकोने त्याला हलवून जागा केला आणि हातात बेड टी चा कप देऊन ती निघून गेली. चहाचा घोट घेत घेत त्याने रिमोटने टी.व्ही. चालू करून आपला फेव्हरेट न्यूज चॅनेल ट्यून केला. टी.व्ही. च्या पडद्यावर ब्रेकिंग न्यूज ची पट्टी झळकत होती --- "आश्लेषा सोनावणे नावाच्या महिलेचा तारांगण इमारतीच्या ७ व्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू!" मोहनच्या पायाखालची जमीनच सरकली होती. चहाच्या कपासहित तो तिथेच थिजून गेला. @शैलेंद्र दिंडे. २३/०७/२०१६